पानी फ़ाउंडेशनची स्थापना २०१६ मध्ये ‘सत्यमेव जयते’ या टिव्ही कार्यक्रमाच्या मुख्य टीमने केली. ग्रामीण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून संपन्न, समृद्ध करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. कित्येक दशके या दुष्काळाने राज्यातील हजारो गावांना अक्षरक्ष: उजाड केले आहे. मात्र ही फक्त नैसर्गिक आपत्ती नाही, तर यासाठी मुख्यत: मनुष्य कारणीभूत आहे. पाण्याच्या नियोजनातील निष्काळजीपणा आणि निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर झालेला ऱ्हास यामुळे आपल्याला महाराष्ट्राला आज या मानवनिर्मित संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
मात्र आपल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, तर तिच्यावर उपायही आपणच शोधायला हवा.
म्हणूनच पानी फ़ाउंडेशनमध्ये आम्ही प्रामुख्यानं दुष्काळाबरोबर दोन हात करण्यासाठी लोकांची एकत्रित चळवळ उभी करण्याच्यासाठी सज्ज आहोत. आम्ही लोकांना एकत्र आणतो, त्यांना प्रशिक्षण देतो आणि गावांना दुष्काळाबरोबरच्या या लढ्यात पुढाकार घेण्यासाठी प्रेरणा देतो.
२०१६ ते २०१९ या काळात आम्ही सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेतली. गावात उत्कृष्ट मृदा आणि जलसंधारण (पाणलोट विकास) करण्यासाठी हजारो गावांनी सहभागी होऊन नवा इतिहास घडवलेली ही स्पर्धा. या स्पर्धेने दिलेल्या शिकवणीच्या आणि यशाच्या आधारे २०२० मध्ये आम्ही सत्यमेव जयते समृद्ध गाव ही स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रामीण पर्यावरण आणि अर्थव्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली ही अधिक व्यापक स्पर्धा आहे. अनेक यशोगाथा समोर आल्या, आणि त्याचप्रमाणे बरच काही शिकायला मिळालं.
शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी हे पाणी वापरण्याची नितांत गरज असल्याचे आम्हाला जाणवले. अशा प्रकारे, मे २०२२ पासून, आम्ही सत्यमेव जयते फार्मर कप लाँच केला. शास्त्रशुद्ध पद्धती वापरून उत्पादन वाढवणे आणि याकरिता शेतकऱ्यांना गटाच्या स्वरूपात एकत्र येण्यासाठी प्रेरित करणे हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे.
पानी फ़ाउंडेशनची स्थापना २०१६ मध्ये ‘सत्यमेव जयते’ या टिव्ही कार्यक्रमाच्या मुख्य टीमने केली. ग्रामीण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून संपन्न, समृद्ध करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. कित्येक दशके या दुष्काळाने राज्यातील हजारो गावांना अक्षरक्ष: उजाड केले आहे. मात्र ही फक्त नैसर्गिक आपत्ती नाही, तर यासाठी मुख्यत: मनुष्य कारणीभूत आहे. पाण्याच्या नियोजनातील निष्काळजीपणा आणि निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर झालेला ऱ्हास यामुळे आपल्याला महाराष्ट्राला आज या मानवनिर्मित संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
मात्र आपल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, तर तिच्यावर उपायही आपणच शोधायला हवा.
म्हणूनच पानी फ़ाउंडेशनमध्ये आम्ही प्रामुख्यानं दुष्काळाबरोबर दोन हात करण्यासाठी लोकांची एकत्रित चळवळ उभी करण्याच्यासाठी सज्ज आहोत. आम्ही लोकांना एकत्र आणतो, त्यांना प्रशिक्षण देतो आणि गावांना दुष्काळाबरोबरच्या या लढ्यात पुढाकार घेण्यासाठी प्रेरणा देतो.
२०१६ ते २०१९ या काळात आम्ही सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेतली. गावात उत्कृष्ट मृदा आणि जलसंधारण (पाणलोट विकास) करण्यासाठी हजारो गावांनी सहभागी होऊन नवा इतिहास घडवलेली ही स्पर्धा. या स्पर्धेने दिलेल्या शिकवणीच्या आणि यशाच्या आधारे २०२० मध्ये आम्ही सत्यमेव जयते समृद्ध गाव ही स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रामीण पर्यावरण आणि अर्थव्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली ही अधिक व्यापक स्पर्धा आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
प्रमुख वैशिष्ट्ये

सामाजिक ऐक्य वाढवणे आणि अडथळे दूर करणे

ग्रामीण पर्यावरणव्यवस्था आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी माहिती (ज्ञान) आणि प्रशिक्षण देणे

समस्येची स्वत:हून जबाबदारी घेणे आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहन देणे
ताज्या बातम्या
आपल्या फार्मर कप मधील अनेक शेतकरी गटांची पिकं कापणीला आली आहेत, आणि शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळू लागला आहे! पाहा शेतकऱ्यांच्या या जोमदार यशोगाथा ‘तुफान आलंयाचा हा एपिसोड मध्ये!
प्रभाव
एखादी लोकचळवळ गावाचा चेहरामोहराच नाही तर मानसिकतासुद्धा कशी बदलू शकते, हे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांनी सिद्ध केले. अवघ्या चार वर्षात, हजारो नागरिकांनी वॉटर हिरो आणि कम्युनिटी लीडर्स (समुदायाचे नेते) म्हणून ओळख मिळवली आहे.
0 अब्ज
क्षमतेचे काम झाले
0 +
प्रभाव
एखादी लोकचळवळ गावाचा चेहरामोहराच नाही तर मानसिकतासुद्धा कशी बदलू शकते, हे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांनी सिद्ध केले. अवघ्या चार वर्षात, हजारो नागरिकांनी वॉटर हिरो आणि कम्युनिटी लीडर्स (समुदायाचे नेते) म्हणून ओळख मिळवली आहे.
0 अब्ज
क्षमतेचे काम झाले
0 +
आमचे आधारस्तंभ





आमचे आधारस्तंभ




